अबब!नागपूरकरांनी रिचवली दीड हजार कोटींची  दारू!

spot_img

नागपूर: मागील तीन वर्षांत नागपूरकरांनी एक हजार ४८५ कोटी रुपयांची दारू रिचवली असल्याचे पुढे आले आहे. वाढत्या नागरी वस्त्यांमुळे ‘मिश्र संस्कृती’ उदयास आली आहे. याचा परिणाम मद्यातून मिळणाऱ्या महसुलावरदेखील झाला असून, वर्षागणिक दारू रिचविण्याचा आकडा वाढत आहे.
धूम्रपान आणि मद्यपान एक ट्रेण्ड झाला आहे. थर्टीफर्स्टला जिकडे तिकडे दारू पिऊन नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा पडली आहे. तीन महिन्यांत जेवढी दारू विकली जात नाही त्याहूनही अधिक दारू एकट्या ३१ डिसेंबरचा दिवस पिऊन जातो, असे सरकारी आकडे सांगतात. आनंद साजरा करण्याची पद्धत बदलत चालली आहे. हल्ली यात मुलीही मागे नसतात. कित्येक मुलीदेखील स्टेटस म्हणून मुलांसोबत दारू पिताना दिसतात. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत केलेल्या अर्जानुसार, मागील तीन वर्षांत एक हजार ४८५ कोटी रुपयांचा महसूल मद्यातून प्राप्त झाला आहे. त्यातील २०१६-१७ मध्ये ५२१.५ कोटी, २०१७-१८ मध्ये ६६०.५३ कोटी तर २०१८-१९ मध्ये ३०३.३८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर परवाना आणि इतर नियमांचे पालन न केल्यामुळे चार बीअरबार बंद करण्यात आले आहेत. परवाना नसतानाही मद्यविक्री केलेल्या सतरा प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यातून १ लाख ८२ हजार २०० रुपये तडजोड रक्कम प्राप्त करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ३१ डिसेंबर २०१८ रोजी एकाही हॉटेलवर कारवाई करण्यात आलेली नाही.

तीन वर्षांमध्ये मद्यविक्रीशी संबंधित वेगवेगळ्या एकूण ६,१७८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील २०१६-१७मध्ये २०२१, २०१७-१८ मध्ये २३४१, २०१८-१९ मध्ये १८१६ गुन्ह्यांची नोंद आहे. या तीन वर्षांमध्ये एकूण ४ हजार ४८७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर १ लाख ८ हजार ६०५ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. एकूण मुद्देमालाची रक्कम १ कोटी ९० लाख २१ हजार ७२ रुपये इतकी आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़