गडचिरोली,दि.७: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विसामुंडी येथील एका युवकाची हत्या केली. आनंदराव संतु मडावी(३२) असे मृत युवकाचे नाव आहे.बुधवारच्या(दि.६)रात्री सशस्त्र नक्षली आनंदरावच्या गावी गेले. त्यांनी त्याला झोपेतून उठवून बाहेर नेले आणि गळा चिरुन हत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह विसामुंडी गावाबाहेरच्या रस्त्यावर आढळून आला.मागील २० दिवसांत नक्षल्यांनी आठ जणांची हत्या केली असून, ८ वाहनांची जाळपोळही केली आहे.नक्षल्यांनी घटनास्थळी एक पत्रक टाकले असून, त्यात आनंदराव हा एकदा पोलिस भरतीसाठी गेला होता आणि नंतर तो एसपीओ म्हणून काम करीत होता. त्याचे वडीलदेखील पोलिसांचे खबरे होते, म्हणून त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे. पत्रकावर पेरमिली एरिया कमिटी असा उल्लेख आहे.
नक्षल्यांनी केली आणखी एका युवकाची हत्या
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur