गडचिरोली,दि.७: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विसामुंडी येथील एका युवकाची हत्या केली. आनंदराव संतु मडावी(३२) असे मृत युवकाचे नाव आहे.बुधवारच्या(दि.६)रात्री सशस्त्र नक्षली आनंदरावच्या गावी गेले. त्यांनी त्याला झोपेतून उठवून बाहेर नेले आणि गळा चिरुन हत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह विसामुंडी गावाबाहेरच्या रस्त्यावर आढळून आला.मागील २० दिवसांत नक्षल्यांनी आठ जणांची हत्या केली असून, ८ वाहनांची जाळपोळही केली आहे.नक्षल्यांनी घटनास्थळी एक पत्रक टाकले असून, त्यात आनंदराव हा एकदा पोलिस भरतीसाठी गेला होता आणि नंतर तो एसपीओ म्हणून काम करीत होता. त्याचे वडीलदेखील पोलिसांचे खबरे होते, म्हणून त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे. पत्रकावर पेरमिली एरिया कमिटी असा उल्लेख आहे.
नक्षल्यांनी केली आणखी एका युवकाची हत्या
Youtube वीडियोस
1
/
204
थाला पती विजय के ऐतिहासिक जीत के बाद#तामिळनाडू के मुख्यमंत्री बने विजय थालापती#
राजकुमारजी रोत#विजय तलापती को बधाई देने तामिळनाडू#पोहोचे
माननीय चंद्रशेखर बावनकुळे#यांच्या नातूचे नामकरण सोहळा#मुंबई#शासकीय निवासस्थान#short#video#viral#
आपली बस#मे इमर्जन्सी ब्रेक नही है#11 मई हडताल
कामठीच्या खैरी गावातील फोर व्हीलर च्या गोडाऊन मध्ये भीषण आग#500 फोर व्हीलर जळून खाक
शिवाजीराजे चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण#श्री श्री फाउंडेशन च्या वतीने#short#video#viral#
1
/
204



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur